weather update मुंबई : बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल होत आहे. सध्या हवामान विभागानुसार, पूर्व भारतात कमी दाबाची रेषा सक्रिय असून तिचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवत आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सध्या जाणवत असलेला तीव्र उकाडा काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेश ते तेलंगणा आणि आसाम ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे आर्द्रता असलेले वारे महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. परिणामी, पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. weather update
Gold Price Today: आज सोन्याच्या किमतीत काही रुपयांनी घसरण, 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पहा.
दरम्यान, गुजरातमध्ये 15 एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत तापमानात किंचित घट होणार असली तरी त्यानंतर ते पुन्हा 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. नुकत्याच अकोल्यात नोंद झालेल्या 42.2 अंश सेल्सिअस तापमानामुळे ही स्थिती अधोरेखित झाली आहे.
राज्यात उष्णतेच्या झळांमुळे शेती उत्पादनांवरही मोठा परिणाम होत आहे. कमी पाणी आणि वाढती गरमी यामुळे कलिंगड, पपई, स्ट्रॉबेरी, केळी यासारखी फळे उन्हाने होरपळत आहेत. पालेभाज्यांची वाढ ठप्प झाली असून, टोमॅटो, पपई यांचे दर पाच ते आठ रुपये किलोपर्यंत खाली घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे – एकीकडे निसर्गाच्या प्रकोपाचा आणि दुसरीकडे बाजारातील दरघटीचा. weather update